रंगभूमीला नवा आयाम देणारे ‘अधांतर’ इतिहासाचे एक वेदनेचे पान आहे. काळाच्या तुकड्याचा ऐवज आहे. मूल्यपरिवर्तनाची आस असलेले एक जीवनदर्शन आहे...
समाजाच्या एका वर्गाची घुसमट होताना, ती बघत राहणे कितपत योग्य आहे? याविषयीचा कृतिशील उद्गार म्हणजे हे नाटक. जनतेच्या व्यक्तींच्या व्यथा वेदना इथे मांडल्या आहेत. कामगार वर्गाची, त्यांच्यातील उद्वेगाची जाणीव व्यक्त करत जयंतने पोटतिडकीने हे सत्य मांडले. या नाटकाने प्रेक्षकांना नाटक आणि वास्तवाचे सणसणीत भान, बघण्याची दृष्टी दिली. रंगभूमीवरील पारंपरिक साचेबंदपणाची मोडतोड केली.......